"वेदना "
"वेदना "
आपल मन दुखावून
काय मिळत लोकांना कळत नाही
आपण इतका जीव लावतो
पण त्या मागची काळजी
कोणाला दिसतच नाही
दूरच जायच असत तर
जवळ कशाला येतात
आपल आपल म्हणतात आणि
आपल्यातल आपलेपणच विसरतात
नेहमी तुझ्या बरोबर रहावू
अस तर नेहमीच म्हणतात
चार दिवस चांगल वागतात आणि
नंतर आपल्यालाच विसरतात
कोणाला साथ द्यायची असेल
तर शेवट पर्यंत द्या मित्रांनो
नाहीतर क्षणभराचा आनंद तर
मुके प्राणी ही देतात.....
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा